
सुमित्रा आईच्या मनात संशय येणार?
दुसरीकडे, किचनमध्ये काम करत असताना जानकी सुमित्रा आईला याबद्दल विचारणार आहे. तर, सुमित्रा आईऐवजी आजी खोचक उत्तर देणार आहे. ‘ऑफिसमध्ये खुर्ची पाठवावी लागणारच नां.. तिकडे सारंगला सावत्र वागणूक जी मिळतेय’, आजीचं हे बोलणं ऐकून जानकीला वाईट वाटणार आहे. तर, सुमित्रा देखील काहीही न बोलता तिकडून निघून जाणार आहे. तर, सुमित्रा आई काहीच बोलल्या नाहीत म्हणजे त्यांना हे पटलं, असं वाटून आता जानकीला देखील मोठा धक्का बसणार आहे.







