
रणदिवेंना मिळणार सौमित्रच्या लग्नाचं आमंत्रण!
आता बाबा दोघांनाही सौमित्रला का भेटायला गेलात, असा प्रश्न करणार आहेत. तर बाबांच्या प्रश्नांची उत्तरे देताना हृषिकेश त्यांना सौमित्र लग्न करत असल्याचा सांगणार आहे. इतकंच नाही, तर त्याने आपल्या संपूर्ण कुटुंबाला लग्नासाठी बोलावलं असल्याचं देखील हृषिकेश सगळ्यांना सांगणार आहे. मात्र, कोणीही सौमित्रला भेटायला किंवा त्याच्या लग्नाला जायचं नाही, असा निर्णय बाबांनी घेतला असून, ते प्रत्येकाला यासंबंधी सूचना करणार आहेत. यामुळे आता जानकी आणि हृषिकेश चांगलेच अडचणी सापडले आहेत. कोर्टात लग्न करण्यासाठी सौमित्रच्या बाजूने जानकी आणि हृषिकेशने येण्याचे वचन दिले होते. आता हे वचन ते कसे पूर्ण करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.