Gharoghari Matichya Chuli: अखेर भाऊच भावाच्या मदतीला धावून येणार! सारंगचा जीव वाचवण्यासाठी ‘हा’ व्यक्ती धावणार

0
2
Gharoghari Matichya Chuli: अखेर भाऊच भावाच्या मदतीला धावून येणार! सारंगचा जीव वाचवण्यासाठी ‘हा’ व्यक्ती धावणार


Gharoghari Matichya Chuli 16 August 2024 Serial Update: सध्या मालिका विश्वात ‘घरोघरी मातीच्या चुली’ ही मालिका प्रचंड चर्चेत आहे. या मालिकेत अनेक भावनिक बंध उलगडताना दिसत आहेत. मात्र, आता या मालिकेत अतिशय धक्कादायक वळण येताना पाहायला मिळणार आहे. एकीकडे आधीच रणदिवे कुटुंबातून अनेक नाते दुरावली आहे. आधीच सौमित्रला नानांनी घरातून बेदखल केले आहे. सौमित्रचे लग्न सुरुवातीला ऐश्वर्यासोबत ठरवण्यात आलं होतं. सौमित्रने अवंतिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच धक्का दिला होता. सौमित्रचं हेच वागणं नाना रणदिवे यांना खटकलं आणि त्यांनी सौमित्र म्हणजेच स्वतःच्या मुलाला आपल्याला घरातून बेदखल केलं. लग्न मोडल्यानंतर ऐश्वर्याचे सारंगशी लग्न ठरवण्यात आलं. मात्र, यामुळेच ऐश्वर्या प्रचंड चिडली आहे. ऐश्वर्याला सारंगशी लग्न करायचं नव्हतं. जबरदस्तीने तिला हे लग्न करावं लागलं. मात्र, सारंगशी लग्न करून बायको म्हणून रणदिवे कुटुंबात आल्यावर या सगळ्यांकडूनच बदला घेत आहे. 



Source link