फलटण :- डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा! डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते.त्यांच्या आणि गांधीजींच्या संबंधांबद्दल अनेक विचारवंतांनी मांडणी केली आहे.या प्रस्तुत लेखात अहिंसेबद्दल त्यांची मते परस्पर पूरक होते की त्यांच्यात तीव्र मतभेद होते.हे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.तसेच गांधीजींच्या मतांमध्ये परिवर्तन कसे होत गेले हेही यातून लक्षात येईल.हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त घेतलेला आढावा………
सत्य अहिंसेवरील गांधीजींची निष्ठा अपूर्व होती. त्यांचे जीवन अत्यंत शिस्तमय,सुसूत्र आणि शाश्वत मानवी मूल्यांवर आधारलेले होते.अहिंसा आणि सत्यावर त्यांची अढळ श्रध्दा असल्याने आयुष्यभर त्यांनी त्याचा पुरस्कार केला. २ ऑक्टोबर हा म.गांधीजींचा जन्मदिन सरकारी कार्यालयातून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी सर्व कार्यालयांना, बँकांना, शाळा महाविद्यालयांना सार्वजनिक सुट्टी जाहिर करण्यात येते. २ ऑक्टोबर २००७ या दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबर हा दिवस संपूर्ण जगभर आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा करण्यात येणे हे सर्व भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे.यामुळे जगाने सत्य अहिंसेची शिकवण देणार्या् या महात्म्याला वंदन केले आहे.परंतु गांधीजींच्या अहिंसेच्या संकल्पनेवर बरीच मतमतांतरे आहेत. त्यांच्या याबाबतच्या भूमिकेमुळे त्यांना नेहमीच टीकेचा सामना करावा लागला आहे.तो आज ही काम आहे.
गांधींची शिकवण पाहिली तर ती दिसायला मोठी गोंडस आहे. सत्य आणि अहिंसा ही उदात्त तत्वे आहेत हे सांगण्याची आवश्यकता नाही. ती अगदी अनादिकालापासून मानवी समूहाने आत्मसात केलेली आहेत.तरीही गांधीजींनी ही तत्वे आधुनिक जगाला अपूर्व गाजावाजाने सांगितली. गांधीजी म्हणतात,‘अहिंसा हा सत्याचा पाया आहे. सत्याला जर अहिंसेचा आधार नसेल तर सत्याचे पालन असंभवनीय आहे.’असा माझा विश्वास आहे.अति तृष्णा सोडा, शेजार्यांरची सेवा करावयास शिका, व्यवहारात सत्यता पाळा,सहिष्णू बना, ईश्वरावर विश्वास ठेवा. लोभामुळे कोणावरही आक्रमण करू नका,कोणी दृष्टपणाने तुमच्यावर आक्रमण केले तर त्याला न मारता स्वत: मरायला शिका, भ्याडपणा आणि अहिंसा एक नव्हेत. शौर्याच्या परिसीमेला अहिंसा हे दुसरे नाव आहे. बलवानच क्षमा करू शकतो. पृष्ठ.91-92 असा पद्धतीने गांधीजीनी नि:शस्त्र प्रतिकारच्या पद्धतीचा स्वीकार केला आहे.
गांधीजींचे अहिंसेचे स्वरूप कसे आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी इंग्रज लोकांना उद्देशून जे अनावृत पत्र लिहिले त्या पत्रावरून स्पष्ट होते. जर्मन लोकांनी इंग्लंडवरती स्वारी केली असताना आपला बचाव कोणत्या मार्गाने करावा याबाबतीत इंग्रज लोकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात गांधीजी म्हणतात, ‘ब्रिटिश जनतेने शस्त्राशिवाय जर्मन राष्ट्राचा प्रतिकार करण्याचा निर्धार करावा.हिटलर किंवा मुसोलिनी इंग्लिश भूमीवर स्वारी करण्याच्या अगोदरच ‘या तुम्हाला हवे असेल ते घ्या’ असे जाहिर करा तसेच हिटलरला स्वारी करून जे काही घ्यायचे असेल ते त्याला घेऊ द्या व हिटलर व त्याच्या सैनिकांना जर तुमच्या घरादारांचा ताबा घ्यावयाचा असेल तर व हिटलर जर तुम्हाला देश सोडून जाऊ देत नसेल तर त्याच्या हातून मरण्यास सिध्द व्हा. परंतु आत्मरक्षणासाठीकोणत्याही शस्त्रास्त्रांचा उपयोग करू नका.’’268 गांधीजींची ही योजना कोणताही सुज्ञ माणूस स्वीकारू शकत नाही. कारण सर्वच ठिकाणी अहिंसा धर्म पाळणे कठीण आहे. गांधीजींची नि:शस्त्र प्रतिकाराची योजना मनुष्यमात्राच्या जीवनाला पूर्णपणे उपयुक्त आहे असे म्हणता येणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी याविषयी विस्तृतपणे आपले मत मांडले आहे. ते म्हणतात, …….. “आज जगामध्ये अनेक राष्ट्रे गुलामगिरीत आहेत. त्या सर्व राष्ट्रांची मुक्तता व्हावयाची आहे. नैतिक बळाने त्यांची मुक्तता होणे शक्य असेल, तर पाशवी शक्तीचा विनाकारण उपयोग करा, असे म्हणणार्यात माणसास वेडयात काढण्यास कोणीच हरकत घेणार नाही.परंतु नैतिक बळाने हे कार्य होणार नसेल तर या कार्याला पाशवी शक्तीचा उपयोग करू नये, असे म्हणणार्याी माणसालाही मूर्खात काढल्याशिवाय गत्यंतर नाही. शक्ति साधन आहे.स्वातंत्र्य हे ध्येय आहे.ध्येय जर निष्कलंक व शुद्ध असेल तर त्या ध्येयाची सिद्धी करण्याकरिताआत्यंतिक साधनांचा उपयोग करण्यास नीतीचे तत्व आड येऊ शकत नाही व जर आले तर ते नीतीचे तत्व खोटे आहे.असे म्हणण्यास काही हरकत नाही. अहिंसा हे साधन आहे. ध्येय नव्हे आणि ध्येयानुसार साधनांची युक्तायुक्तता ठरवायची असते.’’275 पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “ अहिंसा एक साधन आहे. ध्येय संपादनाकरिता ते जर पुरे पडत असेल तर पाशवी शक्तीचा कोणीही उपयोग करू नये,असे म्हणता येईल, परंतु ध्येयाच्या संपादनाकरिता जर अहिंसेचे साधन अपुरे पडत आहे आणि ध्येयाचा नाश होत आहे, तरी सुद्धा अहिंसेशिवाय दुसर्यात कोणत्याच साधनाचा उपयोग करता कामा नये,असा आग्रह धरणार्यान माणसाला मूर्खातच काढावे लागेल.”275 असे विस्तृत मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडले आहे.
वास्तविक पाहता सत्य आणि अहिंसा ही उदात्त तत्वे असून बुद्धानी ही तत्वे अखिल मानवजातीला दिलेली आहेत. त्याच्यामुळे याचे श्रेय गांधीजींना देता येणार नाही. गांधीजींनी त्याला व्यापक अर्थ देण्याचा प्रयत्न केला असे हवे तर म्हणता येईल.कारण मानवी समाजाच्या रक्षणासाठी सत्य व अहिंसा ही दोन तत्वे उपयुक्तच नाहीत तर अत्यावश्यकच आहेत. हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
बुद्धाची अहिंसा
वैष्णव तथा जैन धर्मातील अहिंसेचा गांधीजींच्या मनावर मोठा पगडा होता. त्यामुळे गांधीजींच्या अहिंसेची संकल्पना यात तफावत आहे. अहिंसा तत्व हे याच भूमित उदयाला आले. आर्य लोक हे ध्येयाने व कृतीने हिंसावादी होते. यज्ञ हा त्यांच्या धर्माचा मुख्य पाया. त्या यज्ञात हिंसा व मद्यपान याशिवाय दुसरे काहीच नसे. या हिंसेचा इतका अतिरेक झाला होता की,त्या काळच्या काही आर्य लोकांना त्यांच्या हिंसेचा वीट आला होता.या हिंसक आर्य धर्माला कंटाळून महावीराने अहिंसावादी जैन धर्म प्रस्थापित केला. पण या दोहोत तत्वाचा अतिरेक झाला. आर्यांची आत्यंतिक हिंसा वृती तर जैनांची आत्यंतिक! या दोन्ही अव्यवहारी वृती असल्याने गौतम बुद्धाने आपला बौद्ध धर्म प्रस्थापित केला. या दोहोतील अतिरेक सोडून त्यातील सुवर्ण मध्य साधण्याचा प्रयत्न बुद्धाने केला. ,‘शक्य तोवर अहिंसा, जरूर तर हिंसा ही गौतम बुद्धाची भूमिका होती.”277थोडक्यात तथागत गौतम बुद्धाने या दोन्ही भूमिका तपासूनच सुवर्णमध्य साधला आहे. कारण अहिंसा व हिंसा ही दोन साधने आहेत. त्यामुळे शक्य तोवर अहिंसा मार्गाचा वापर करून शांततेसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे. परंतु जर ध्येय नैतिक मूल्यांवर आधारित असेल व त्या ठिकाणी त्यांच्या पूर्तीसाठी हिंसा करावी लागत असेल तर ती करण्याचे स्वातंत्र्य बुद्धाने दिले आहे. बुद्धाने अहिंसेला तत्व मानले. गांधीजींनी मात्र अहिंसेला नियम मानले; नियम पाळावयाचा असतो. नियम झाला की माणूस त्याचा गुलाम होतो. तत्व ठरले की माणूस त्याचा उपासक होतो. हा फरक तत्व आणि नियममध्ये असतो.
2 मार्च 1922 च्या यंग इंडियाच्या अंकात अहिंसेविषयी गांधीजींनी काही मुद्दे स्पष्ट केले.त्यामध्ये ते म्हणतात,
‘……I may be bold to say that violence is the creed of no religion and that, where as non-violence in most cases, is obligatory in all, violence is merely permissible in some cases. But I have not put before India the final from of non-violence……’279
हिंसा हे कोणत्याच धर्माचे ब्रीद नाही. उलटपक्षी बहुतेक सर्व धर्मात आहिंसा धर्माचे पालन करण्याचे बंधन त्या त्या धर्मातील व्यक्तीमात्रावर घालण्यात आले असून प्रसंगविशेष केवळ आपद्धर्म कर्म म्हणूनच हिंसेला मान्यता देण्यात आलेली आहे. शिवाय आत्यंतिक स्वरुपाच्या अहिंसेचा मार्ग मी हिंदुस्तानपुढे ठेवलेला नाही.’279यावरून गांधीजींनी आत्यंतिक स्वरुपाच्या अहिंसेचा मार्ग सांगितला नसल्याचे प्रतित होते. गांधीजींनी वेळोवेळी आपल्या मतांमध्ये बदल केला आहे. याचाच प्रत्यय 9 मार्च 1922 च्या यंग इंडियाच्या अंकातील विचारावरून येतो, ते म्हणतात,’
‘……I entirely endorse that opinion that swaraj is the nation’s goal, not non-violence, it is true that my goal is as much swaraj as non-violence because I hold swaraj for the masses to be unattainable save through non-violence.But have I not repeatedly said in these columns that it would have India to become free even by violence rather that she should remain in bondage?” 280
“ राष्ट्राचे ध्येय स्वराज्य आहे,अहिंसा नव्हे या मताला माझी पूर्ण संमती आहे. माझ्या बाबतीत ही अहिंसा हे माझे ध्येय आहे. परंतु त्याबरोबर स्वराज्य हे देखील माझे ध्येय आहे, हे ही तितकेच खरे आहे कारण अहिंसा मार्गाचा अवलंब केल्याशिवाय जनतेला स्वराज्य प्राप्ती होणे अशक्य आहे. परंतु हिंदुस्तान देश पारतंत्र्याच्या बेडीत खितपत राहण्यापेक्षा अत्याचारच्या मार्गाने स्वराज्य मिळवणे मी पत्करेल……..२७९.”
गांधीजींनी दि.२९मे १९२४ च्या यंग इंडियाच्या अंकात हिंदू मुसलमानाच्यादंग्यावरती एक लेख लिहिला त्यात असणारी त्यांची मते त्यांच्यामध्ये झालेले परिवर्तन दर्शवितात.
‘……I do not say ‘ eschew violence in your dealing with robbers or thieves or with nations that may invade India .’ But in order that we are better able to do so, we must learn to restrain ourselves. It is a sign of strength but of weakness to take up the pistol on the slightest pretext. Mutual fisticuffs are a training not in violence but in emaseution. My method of non- violence can never lead to loss of strength, but it alone will make it possible, if the nation wills it, to offer disciplined and concerted violence in the time of danger.’282
‘………चोर,दरोडेखोर अगर हिंदुस्तान देशावर सवारी करणार्याcराष्ट्राचा समाचार घेताना ‘अत्याचार टाळा,अहिंसा पाळा’ असे मी मुळीच म्हणत नाही. परंतु अनत्याचारी व्रत धारण करण्यास समर्थ होण्यासाठी आपण संयम राखण्यास शिकले पाहिजे.क्षुल्लक कारणासाठी पिस्तुलाला हात घालावे हे ताकतीचे लक्षण नसून कमकुवतपणाचे लक्षण आहे. आपापसातील हातघाईने अत्याचाराचे शिक्षण न मिळता उलट नामर्दपणाच निर्माण होतो. माझ्या अनत्याचारीपद्धतीने बलहीनता येणे कदापि शक्य नसून,उलट ती मुळेच वेळ पडल्यास संकटसमयी राष्ट्राची इच्छा असल्यास पद्धतशीर शिस्तीने संघटितपणे अत्याचारी मार्गाचा अवलंब करणे शक्य होईल.’२८२
वरील लेखामधील गांधीजींचे मत हे त्यांचे परिवर्तन दर्शविते. ज्यावेळी बार्डोलीचा कायदेभंगाचा कार्यक्रम पुढे ढकलला गेला त्यावेळी गांधीजींची त्याबद्दल मिस्टर पोल रिचर्ड नावाच्या गृहस्थाबरोबर चर्चा झाली होती त्यावेळी गांधीजी म्हणाले,
“ I do not work for freedom of India, I work for non-violence in the world and that is the difference between me and Mr.Tilak. Mr.Tilak was telling me, ‘I would sacrifice even truth for freedom of my country; but I am ready to sacrifice even freedom for the sake of truth.”
“माझे कार्य हिंदुस्थान देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे हे नसून जगात अहिंसा तत्वाची प्राण प्रतिष्ठा करणे हे आहे. हा मी आणि टिळक यांच्यातला भेद आहे. टिळक मला म्हणत,”
माझ्या देशाच्या करिता मी सत्याचा देखील बळी देईल.’परंतु मी म्हणतो की,’सत्याकरिता देशाच्या स्वातंत्र्याचाच बळी देण्यास देखील माझी तयारी आहे.”२८३
वरील विधानाचा खुलासा मि. रिचर्ड यांनी त्यावेळच्या ‘लोकमान्य’ वृत्तपत्राच्या प्रतिनिधींशी केला व म्हणाले की,गांधीजींची तहान हिंदुस्थानच्या पुढारपणानेभागणार नसून त्यांना जगातला महात्मा होण्याची इच्छा झाली आहे. या विधानासंबंधी पत्रकारांनी गांधीजींना विचारले त्यास उत्तर देण्यासाठी गांधीजींनी २३ फेब्रुवारी १९२२ च्या यंग इंडिया च्या अंकात ‘Noendtomysorrow’ माझ्या खेदाला सीमा उरली नाही हा लेख लिहिला.त्यात त्यांनी संगितले की,माझ्या तोंडी मि. रिचर्ड यांनी जे शब्द घातले आहेत त्यात अंतर्भूत असलेले सत्य मला नाकबूल करता येणार नाही,’It is not possible to deny the substance of it.)284 यावरून गांधीजींना जगातील अद्वितीय पुरुष म्हणून किर्ती संपादन करण्याची ओढलागल्याचे मि. रिचर्ड स्पष्ट करतात. याचाच भाग म्हणून गांधीजींनी आपल्या मतांमध्ये आमुलाग्र बदल घडवले. अगदी शेवटी ते म्हणतात,
“ माझ्या श्रद्धाबद्दल मी गर्व बाळगीत नाही. पण माझ्या इतका दूसरा अहिंसेचा उपासक असेल असे मला वाटत नाही. माझी अहिंसा शुरांची आहे:भ्याडांची नाही. मी अहिंसेचे व्रत घेतले. यादवी युद्ध,भाऊ बंदकी:हिंदू मुस्लीम दंगल यांच्या मी पूर्ण विरोधी आहे. पण जेव्हा काही खडतर निर्णय घ्यायचे असतात,तेव्हा मला रक्तपाताची भिती वाटते. आज मला माझी अनुकंपा वाटत आहे.”१
गांधीजींचा पिंड आध्यात्मिक असल्याने त्यांनी समाजकारण, राजकरणाला आध्यात्मिक आणि अहिंसात्मक अधिष्ठान दिले. १९२७ साली भारत भेटीवर आलेल्या रेव्हरंड मोटयाधर्मगुरूच्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले,’ कितीही दाबाब आणून चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला तरी त्याला अहिंसक आणि शांततापूर्ण प्रतिकार करण्याची येथील गरीब आणि सामान्य माणसाची क्षमता मला उमेद देणारी आहे.’१६-१७ त्यामुळे या देशाबद्दल मला आशा वाटते. वरवर पाहता गांधीजींनी आत्यंतिक अहिंसेचा स्वीकार केला नसला तरी त्यांच्या कृतीतून मात्र त्यांनी आत्यंतिक अहिंसेचाच पुरस्कार केल्याचे प्रतित होते. हिंसेपासून पुर्णपणे अलिप्त राहणेच त्यांनी पसंत केले आहे. अहिंसेचा गर्भितार्थ सांगताना ते म्हणतात,’दृष्टत्वाशी असहकार केल्याने मिळणारी शिक्षा स्वेच्छेने स्वीकारणे म्हणजे अहिंसा’११६ असा अहिंसेविषयी दृष्टीकोन गांधीजी मांडतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांची अहिंसेविषयीची भूमिका परस्पर पूरक वाटते.डॉ. आंबेडकर ही अहिंसेचे पुरस्कर्ते होते. परंतु सत्यावाचून अहिंसेला अर्थ नाही अशी त्यांची भूमिका होती. सुप्तावस्था म्हणजे अहिंसा नव्हे. बलवंतांची अहिंसा त्यांना मान्य होती. म्हणून बर्टाड रसेलच्या अहिंसेचे त्यांनी कौतुक केले. महाड सत्याग्रहात प्रतिकारापासून अलिप्त ठेवले परावृत्त केले.’१४४ २० जुलैच्या समता सैनिक दलाच्या अधिवेशनात त्यांनी अहिंसेच्या तत्वाची चर्चा केली. यासाठी त्यांनी तुकारामाच्या प्रसिद्ध अभंगाचा आधार घेतला. ‘भूतदया आणि दृष्टांचे निर्दालन’ यातील ‘दृष्टांचे निर्दालन’ हे महत्वाचे असून शीलाचे नियंत्रण असलेली शक्ति हाच आमचा आदर्श आहे. असे जाहिर सांगितले.गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर त्यांच्या हयातीत नव्हे तर आजही खूप टीका होते. गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर आक्षेप घेताना सुभाषचंद्र बोस, म्हणाले,‘ जर गांधीजी दुसर्याो देशात जन्माला आले असते तर त्याठिकाणी ते राहू शकले नसते. त्यांच्या अहिंसेच्या सिद्धांतामुळे त्यांना सुळावर चढवले असते किंवा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवले असते. हिंदुस्थानची गोष्ट वेगळी आहे. पृ.६६ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही १९४१ साली अहमदाबादेत पेटलेल्या जातीय दंगली संबंधी आपल्या मालकीच्या ‘जनता’ या पत्रात ११ मे १९४१ ला लेख लिहून गांधीजींच्या अहिंसेच्या सिद्धांताची आलोचना केली. या मराठी लेखात त्यांनी गांधीजींचा उल्लेख एकेरी केला आहे. ते म्हणतात,‘ज्या दिवशी गांधीला ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली तो दिवस देशाच्या इतिहासात मोठा दुर्भाग्याचा आणि ज्या महापुरुषाला गांधीजीला महात्मा ही पदवी देण्याची बुध्दी झाली त्याला काळपुरुष समजण्यास हरकत नाही. महात्मा सर्व परीने जनतेवर आपत्ती आहे… लोक खुळे असल्याखेरीज महात्मेगिरी चालू शकत नाही आणि महात्मेगिरीचा पगडा लोकांवर बसला म्हणजे लोक खुळे होतात,गुलाम बनतात,गांधीची महात्मेगिरी अहिंसेवरच उभारलेली होती. अहिंसेच्या घोषणेमुळे ती टिकून राहिली. एकंदरीत गांधीजी अहिंसा म्हणजे एक मोठे ढोंग होते हे अहमदाबादच्या दंगलीमुळे सिद्ध झाले.
अहमदाबादला हिंदू-मुसलमानांचा दंगा झाला नसता आणि तेथील हिंदूंची अहिंसेमुळे धूळधाण झाली नसती तर गांधी अहिंसेचे ढोंग आपल्या बडेजावाकरता तसेच उराशी धरून बसला असता अहमदाबादच्या दंग्याने ‘बरे झाले, राख उडाली, कोळसा राहिला, महात्मा गेला माणूस राहिला’ असे उद्गार काढण्यास जागा झाली. असा प्रकारे डॉ. आंबेडकरांनी गांधीजींच्या अहिंसा सिद्धांतावर खरमरीत टीका केली.गांधीजींनी काळानुरूप आपल्या मतांमध्ये परिवर्तन घडवले.त्यांची अहिंसा म्हणजे कुणाला न मारणे अथवा जखमी न करणे एवढाच भाग नव्हता. त्यांची अहिंसा भ्याडाची नव्हती तर शुराची होती.अहिंसेला गांधीजींनी आपल्या एकादशव्रतात स्थान दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अहिंसा ही सुद्धा बलवंताचीच होती. त्यांच्या अहिंसेच्या मताचा विचार करता एखाद्या स्त्रीवर जर अत्याचार होत असेल तर तिने जिवाच्या आकांताने त्याचा प्रतिकार केला पाहिजे प्रसंगी त्यात प्राण गेले किंवा घेतले तरी हरकत नाही.कोणत्याही प्रकारच्या अत्याचारला शरण न जाता त्याचा निकराने प्रतिकार करणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत होते. आपल्या न्यायी हक्कांसाठी शक्य तोवर अहिंसेच्या मार्गानेच लढा द्यायचा. त्यातून जर अपयश येणार असेल तर मात्र कोणत्याही प्रकारच्या लढ्याला सामोरे जाण्यासाठी हिंसेचा मार्ग चोखळला तरी हरकत नाही. परंतु प्रत्यक्षात मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही लढ्यामध्ये सनदशीर मार्ग सोडला नाही. आपले प्रत्येक आंदोलन हे नि:शस्त्र तत्वानेच पूर्णत्वाला नेले. मानवी हक्कांसाठीची लढाई त्यांनी बुद्धाच्या अहिंसेच्या तत्वाप्रमाणे लढून जन सामान्यांना न्यायी हक्क मिळवून दिले. अहिंसेचा खरा अर्थ सर्व प्राणिमात्रांवर,जीव जंतूनवर दया दाखवणे होय.फक्त कायेनेनव्हे तरकायेने, वाचेने,मनाने कोणाचीही हिंसा न करणे म्हणजेच अहिंसा.असाविचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ‘हिंसा, अहिंसा व सत्याग्रह यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनन करण्यासारखा आहे.’
देव्हाऱ्यावरि विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
तेथें पैजारेचें काम । अधमासि तों अधम ॥
दया तिचे नाव भुतांचे पालन ।
आणिक निर्दालन कंटकाचे ॥
“माझा आहिंसेवर विश्वास आहे.पण थोर संत तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे ती आहिंसा असायला पाहिजे. तुकाराम महाराज बरोबरच सांगतात की ,आहिंसा दोन गोष्टींची मिळून होत असते.सर्व प्राणी मात्रांविषयी प्रेम, दया बुद्धी आणि दृष्टांचा संहार. अहिंसेच्या व्याखेच्या या दुसऱ्या भागाकडे प्राय:दुर्लक्ष होते आणि ते तसे होत असल्यामुळे आहिंसा येवढी हास्यास्पद ठरते. सर्व दृष्टांचा संहार करणे हा आहिंसा तत्वाचा प्रमुख घटक आहे.त्याच्या विना आहिंसा ही फक्त पोकळ शिंपल्यासारखी आहे. केवळ शोभेची वस्तू आहे.मग आहिंसा ही एक सकारात्मक कृती उरत नाही. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर(नागपुर येथील समता सैनिक दलाच्या परिषदेत केलेल्या भाषणातून )
या तुकोबाच्या उक्तीशी आंबेडकरांच्या विचाराचे साधर्म्य आहे.”९५ आणि अहिंसा परमो धर्म: हे तत्व सर्वच ठिकाणी पाळता येणे शक्य नाही.
आपला जीव घेणारा,स्त्रीवर अत्याचार करणारा,धनदौलत लुटणारा यांच्याशी झालेल्या झगडयात तो मरण पावला तर त्याच्या हत्येचे पाप हत्या करणार्यामस लागत नाही. जो दृष्ट मरतो तो आपल्या पापकर्माने. हिंसा म्हणजे मन दुखवणे असे असेल तर गांधीजींची अहिंसा ही एक हिंसाच आहे. अशा प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अहिंसा तत्वाचे विश्लेषण केले आहे.
गांधीजी पुढे म्हणतात,“व्यवहारातील सबलतेला बाजूला करून निष्क्रियता पत्करणे,कर्तव्यापासून पराड:मुख होणे याला अहिंसा म्हणता येणार नाही. अन्यायाचा अहिंसात्मक प्रतिकार करणे शक्य नसेल,तर त्यासाठी शस्त्राचा अवलंब केला तरी चालेल. पण भ्याडपणाने स्वस्थ बसणे हे मानवी प्रतिष्ठेला न शोभणारे आहे.”२५ असे मत गांधीजी व्यक्त केले आहे. असे मत व्यक्त करणारे गांधीजी मात्र हिंसात्मक मार्ग हा काही झाले तरी गौण असल्याचे बजावतात. अहिंसेच्या तत्वाला मुरड घालण्याची वेळ येऊ नये याकरता माणसाने आपली नैतिक शुद्धता व सामर्थ्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.२६ असे मत गांधीजी मांडतात. अगदी शंभर टक्के अहिंसा हे अंतिम ध्येय आहे. प्रत्यक्ष जीवनात किती प्रमाणात तिचे आचरण करता येईल,हे प्रत्येकाच्या परिस्थितीवर अवलंबून असून प्रत्येकाने याचा विचार गांभिर्याने करावा. सर्व प्राणिमात्रावर दया दाखवून सत्य व अहिंसेच्या तत्वावर आपले नितिमान जीवन जगण्याचा विचार गांधीजी देतात. गांधीजी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार परस्पर पूरक वाटतात. काळाची पावले ओळखून मानवाला आपली वाट चोखाळावी लागते. याचाच भाग म्हणून गांधीजींनी आपल्या विचारात परिवर्तन घडवून आणले. त्यांना ते परिवर्तन करावे लागले.
सोमिनाथ पोपट घोरपडे
मु.पो.सासकल ता.फलटण जि.सातारा
मो.नं. 9284658690
इमेल : bhimai05@gmail.com