
केरळमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली असून तब्बल 40 वर्षांनंतर अंतराळामध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषित केली आहेत.
केरळ : मागील दोन वर्षांपासून भारताने अंतराळ मोहिमेकडे अधिक लक्ष दिले असून नवनवीन मोहिमा आखल्या जात आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एका महत्त्वकांशी मोहिमेची घोषणा केली आहे. केरळमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत घोषणा केली असून तब्बल 40 वर्षांनंतर अंतराळामध्ये जाणाऱ्या अंतराळवीरांची नावे घोषित केली आहेत.
इस्रोकडून गगनयान मिशनची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये सुमारे सहा टन वजानाची अवकाश यान अवकाशात पाठवले जाणार आहे. तसेच स्वबळावर भारतीय अंतराळवीर देखील पाठवले जाणार आहेत. गगनयान मोहीमेमध्ये अवकाश यान पृथ्वीपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर तीन दिवस प्रदक्षिणा घालणार आहे. या समानवी मोहीमेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकची माहिती दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना पंतप्रधान म्हणाले, देशातील 4 गगनयान प्रवासी ही चार शक्ती आहेत जी माझ्या 140 कोटी कुटुंबातील सदस्यांच्या आकांक्षा अंतराळात घेऊन जाणार आहेत. अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.









