
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जपणारे सरकार आहे. सरकारकडून अतिवृष्टी, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून सर्व योजनांचे नियोजन सरकारकडून केले जाते. महायुतीच्या सरकारने गेल्या दीड वर्षात शेतकऱ्याना ४५ हजार कोटींची मदत केली आहे. सिंचनांचे १२० प्रकल्प मार्गी लावले आहेत. यामुळे राज्यातील १५ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.