
दिल्लीच्या सीमेवर १३ फेब्रुवारीपासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात पंजाबच्या एका शेतकऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या शेतकऱ्याला पतियाळा येथील शासकीय राजिंद्र रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.