
तत्पूर्वी, भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी बुधवारी सांगितले की, दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या विविध मागण्यांसाठी रोखण्यात आले, जर ते (सरकार) शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ देत नसतील, तर मग. शेतकरीही निवडणुकीत त्यांच्या विरोधात मतदान करतील. तसेच त्यांना गावात देखील येऊ दिले जाणार नाही. किमान आधारभूत किमतीची कायदेशीर हमी (एमएसपी), उसाची थकबाकी द्यावी, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत यासह विविध मागण्यांसाठी बीकेयूतर्फे मेरठ येथील जिल्हा मुख्यालयावर निदर्शने करण्यात आली.








