
Sarkari Yojana सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत माहिती पोहोचणे, अगदी सोपे झाले आहे. मात्र, काही समाजकंटक सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, ज्याचा फायदा सायबर गुन्हेगारांना होतो. अशातच सोशल मीडियावर सरकारी योजनेच्या संबंधित माहिती व्हायरल झाली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार प्रत्येक नागरिकाला ४६ हजारांहून अधिक रुपये देणार असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, पीबीआयने या व्हायरल पोस्टमागील सत्यता तपासली आहे.