
Science News in Marathi : जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा तो आपल्यासोबत काहीच नेत नाही. हेच जगातील शाश्वत सत्य आहे. अनेक धार्मिक ग्रंथात आणि आध्यात्मातही हेच तत्व सांगितले आहे. मात्र प्रश्न आहे की, व्यक्तीने जीवनभर जे अनुभव कमावले, आठवणी जपल्या त्या मृत्यूनंतरही जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? या मौल्यवान आठवणी त्या व्यक्तीच्या अस्तित्वाचा मुख्य असतात. मात्र व्यक्तिच्या मृत्यूसोबत त्याच्या आठवणीही त्याच्यासोबत मिटल्या जातात. जगातील वैज्ञानिक अनेक वर्षापासून या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी धडपडत आहेत. एखाद्या मृत व्यक्तिच्या मेंदूतून त्याच्या आठवणी पुन्हा जतन करून ठेवता येणे शक्य आहे का? हा प्रश्न भलेही एखाद्या Sci-Fi फिल्मचा प्लॉट वाटू शकेल, मात्र न्यूरो सायन्सने इतकी प्रगती केली आहे की, या दिशेने शक्यता वाटू लागल्या आहेत. समजून घेऊया असे करणे किती कठीण आहे.