election commission : आचारसंहिता म्हणजे काय ? काय सुरू राहणार आणि काय राहणार बंद? वाचा

0
2
election commission : आचारसंहिता म्हणजे काय ? काय सुरू राहणार आणि काय राहणार बंद? वाचा


तर आचारसंहिता काळात सार्वजनिक उद्घाटनाचे कार्यक्रम, भूमिपूजन बंद राहणार आहेत. तसेच नव्या कामांचा स्वीकार करता येणार नाही. सरकारी कामांचे होर्डिंग्ज, फ्लेक्स, बोर्ड लावता येणार नाही. जी बोर्ड या पूर्वी लावली असतात, ती काढावी लागतात. अथवा कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने ती झाकावी देखील लागतात. मतदार संघांत राजकीय दौरे आयोजित करता येत नाही. सरकारी वाहनांना सायरन लावला जात नाही. शासकीय भवन, कार्यालयात पंतप्रधान, मुख्यमंत्री, मंत्री राजकीय व्यक्ती यांचे फोटो लावता येत नाही. जी लावली असेल ती काढून टाकली जातात. वर्तमानपत्र, इलेक्ट्राॅनिक आणि इतर माध्यमांत सरकारी जाहिराती देता येणार नाहीत. लाच खोरांवर कठोर कारवाई. समाज माध्यमांनवर पोस्ट करताना देखील काळजी घ्यावी लागणार आहे. थोडी चूक सुद्धा जेलमध्ये पाठवू शकते. त्यामुळे पोस्ट शेअर करण्याआधी आचारसंहितेचा विचार करावा लागणार आहे. कोणत्याही नेत्याचा प्रचार करतांना आचार संहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेत खर्च उमेदवारांना करावा लागतो. तसेच उमेदवारी सादर करतांना संपत्ती आणि खर्चाचा तपशील देखील जाहीर करावा लागतो.



Source link