
Eknath Shinde News: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महायुती सरकारने सुरू केलेल्या योजनांची चौकशी केली जाईल. तसेच दोषींना तुरुंगात पाठवले जाईल, असे महाविकास आघाडीतील नेते वारंवार बोलत आहेत. यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही झाले तरी या योजना सुरूच ठेवणार, लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांसाठी १०० वेळा तुरुंगात जावे लागले तरी जाईल, असे मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे.




