
[ad_1]
जालन्यातील लाठीचार्ज घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “नोव्हेंबर २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने सत्तेत असताना मराठा आरक्षणाची घोषणा केली होती. राज्य सरकारने घेतलेला आरक्षणाचा निर्णय उच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला. हे कोणाच्या निष्काळजीपणामुळे घडले, हे सर्वांना माहिती आहे”, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर आरोप केले आहेत.
[ad_2]
Source link
