
राज्यात महायुती प्रचंड बहुमताने सत्तेत आली असली तरी मुख्यमंत्रीपदाचा तिढा अध्याप सुटलेला नाही. एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस, पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याचा खल सुरू असतानाच एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊनमुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल, असे विधान केल्याने मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोललेत जात असतानाच आता शिवसेना नेते उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यातील राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.