दुष्काळमुक्त सातारा: ग्रामविकास मंत्र्यांचा 5 वर्षांचा निर्धार पुसेगावमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना तांत्रिक प्रगतीसाठी मोठी संधी

0
1
दुष्काळमुक्त सातारा: ग्रामविकास मंत्र्यांचा 5 वर्षांचा निर्धार पुसेगावमध्ये कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन; शेतकऱ्यांना तांत्रिक प्रगतीसाठी मोठी संधी

सातारा:   सातारा जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना येत्या पाच वर्षांत पाण्यासह दुष्काळमुक्त करण्याचा निर्धार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराज कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केला.

ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, “सोळशी धरणाला तत्वतः मान्यता मिळाली असून, त्यासाठी जलदगतीने प्रयत्न केले जातील. यामुळे माण, खटाव व कोरेगाव तालुक्यांना बारमाही पाणी उपलब्ध होईल. या धरणातील पाणी जावली तालुक्यालाही मिळावे, यासाठीही प्रयत्नशील आहे.”

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक प्रकल्पांसाठी निधी कमी पडू न देण्याची ग्वाही दिली.

या सोहळ्यात सेवागिरी देवस्थानच्या वतीने प्रगतिशील शेतकऱ्यांना “सेवागिरी शेतीनिष्ठ पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. तसेच महिलांसाठी आरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले होते.

प्रमुख उपस्थिती:
प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, जिल्हा कृषी अधीक्षक भाग्यश्री फरांदे, तहसीलदार बाई माने यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.