
काय आहे प्रकरण?
इंडिया टूडेने दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च रोजी नागपूर कंट्रोल रुमला एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिलीप जोशी यांच्या घराबाहेर २५ लोक हत्यारे घेऊन उभी असल्याची माहिती दिली गेली होती. फोन करणाऱ्या व्यक्तीने त्याचे नाव काटके असे सांगितले. ‘ज्या व्यक्तीने मुकेश अंबानी, अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली होती त्याच व्यक्तीने हा फोन केला होता’ अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.