धारावीला आत्ता आहे ती, ओळख देण्याचं काम धारावीकरांनी केलं आहे. इथल्या सूक्ष्म व लघु उद्योगांच्या माध्यमातून, सर्व जातीधर्माच्या लोकांमधून भारताची प्रतिकृती भासावी, अशी धारावी उभी राहिली आहे. पण इथल्या एक लाख कुटुंबांना म्हणजे सुमारेच पाच ते सात लाख लोकांना बेघर करण्याचं काम मोदी सरकार अदानीच्या माध्यमातून करत आहे. हा हक्क या सरकारला कोणी दिला, असा खणखणीत सवाल मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा आणि धारावीच्या आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.



