
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘राजकारण हा अनिश्चितेतचा निश्चित खेळ आहे. त्यामुळे राजकारणात उद्या काय घडेल, हे सांगता येत नाही. मात्र. तुम्ही जो प्रश्न ज्या अनुषंगाने विचारलात त्यांचे उत्तर मी एकाच वाक्यात देईन. मी येथेच आहे.’ म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे कुठेही जाणार नाही, हे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता कशी दूर होईल, या प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, ‘माध्यमं यासाठी जबाबदार आहे. दररोज सकाळी ९ वाजता एक तुम्ही एक चेहरा दाखवता. तिथूनच सगळी कटुता सुरू होते आणि दिवसभर तेच सुरू राहते. तो चेहरा दाखवणे बंद करा, मग अवघ्या आठ राज्यातील कुटता दूर होईल’, असे टोला फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता लगावला आहे.