
लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे 3 समन्स जारी केले आहेत.
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी आपल्याला अटक करण्याचा डाव असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. ईडीने केजरीवाल यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे 3 समन्स जारी केले आहेत.
तीन समन्स पाठवण्यात आल्यानंतरही केजरीवाल ईडीसमोर चौकशीसाठी हजर झालेले नाही. ईडीचे समन्स हे बेकायदेशीर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी पत्रपरिषदेत केला. अबकारी धोरणप्रकरणी चौकशीसाठी ईडीने केजरीवाल, यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवून 3 जानेवारीला उपस्थित राहण्यास सांगितले होते; परंतु केजरीवाल यांनी ईडीला एक खरमरीत पत्र पाठवून 26 जानेवारीपर्यंत कार्यक्रमात व्यस्त असल्याने आपण चौकशीसाठी ईडी कार्यालयात येऊ शकत नाही.