
आम आदमी पक्षाच्या आरोपांना उत्तरं
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत आम आदमी पक्षाच्या आरोपांनाही उत्तरं दिली. मतदार यादीतून नावं वगळण्यात आल्याचा आरोप त्यांनी खोडून काढला. मतदार यादीतून नावं वगळताना किंवा त्यात भर घालताना योग्य ती प्रक्रिया काटेकोरपणे पार पाडण्यात आली असून, कोणत्याही प्रकारच्या फेरफाराला वाव नाही, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
‘मतदार यादीच्या घोळाविषयीच्या चर्चा अजूनही सुरू आहेत. मात्र या प्रक्रियेत सुमारे ७० पायऱ्या आहेत… मतदार यादी, निवडणूक प्रक्रिया, ईव्हीएम, मतदान केंद्रे, फॉर्म १७ (सी) आणि मतमोजणी केंद्रे, जिथं राजकीय पक्ष आणि उमेदवार आमच्यासोबत उपस्थित असतात. जेव्हा जेव्हा मतदार याद्या तयार होतात, नियमित बैठका घेतल्या जातात, फॉर्म ६ शिवाय ते होऊ शकत नाही, प्रत्येक भागाला बीएलए नियुक्त करण्याचा अधिकार आहे. जे काही दावे आणि आक्षेप घेतले जातात, ते एकाच वेळी प्रत्येक राजकीय पक्षाला दिले जातात; मसुदा संकेतस्थळावर टाकला जातो. जोपर्यंत फॉर्म ७ तयार होत नाही, तोपर्यंत डिलीट करणं शक्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.