
धर्माचा विचार करून त्या मुलाच्या बहिणीचे प्रकरणही राजकारण्याच्या सांगण्यावरून उघडले जाते. दोन्ही प्रकरणांची जबाबदारी एसआय अंजली भाटी (सोनाक्षी सिन्हा), कैलाश पारघी (सोहम शाह) आणि अधिकारी देवीलाल सिंह (गुलशन देवय्या) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. धर्मावरून सुरू झालेले हे प्रकरण असे वळण घेते की, सगळेच चक्रावून जातात. यानंतर २७ मुलींची हत्या करणार्या सीरियल किलरचा मांडवा पोलिस पथक कसा पर्दाफाश करते, आणि हा सिरीयल किलर आनंद स्वर्णकर (विजय वर्मा) या मुलींची हत्या का करतो, हे थरारक कथानक जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज एकदा पाहावी लागणार आहे.






