
प्रचंड मेहतनत घेतल्यानंतर दादासाहेब हे १९१३ साली यशस्वी झाले. त्यांचा पहिला मुखपट ‘राजा हरिश्चंद्र‘ हा तयार झाला आणि भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास घडला. वयाच्या १९व्या वर्षी दादासाहेब यांनी ९५ चित्रपट २६ लघुपटांची निर्मिती केली. या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांचा त्यांना पू्र्ण पाठिंबा होता. सुरुवातील चित्रपट निर्मिती करण्यासाठी आर्थिक मदत दादासाहेबांना हवी होती. त्यावेळी त्यांच्या पत्नीने जवळ असलेले सर्व दागिने विकले होते. तसेच चित्रपटासाठी काम करणाऱ्या लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, त्यांचे कपडे धुणे ही कामे त्या करत. त्यासोबतच चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.








