
चित्रांगदा सिंहने कधीच अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. इतकेच नाही तर, तिने सुपरहिट चित्रपट ‘हजारों ख्वैशीं ऐसी’ नंतर ब्रेक घेतला, तेव्हा तिने अभिनयात परतण्याचा विचारही केला नव्हता. चित्रांगदाला शॉपिंगची आवड आहे. या विषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली होती की, ‘चांगला बँक बॅलन्स खूप महत्वाची आहे. कारण, खरेदी करत राहणे देखील खूप महत्त्वाचे आहे. चित्रांगदाने २००१मध्ये ज्योती रंधावा सोबत लग्न केले होते. मात्र, २०१४मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.







