
विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या काही दिवस आधी भुजबळ यांनी आपला विरोध तीव्र केला. “मराठा समाज हा सत्ताधारी समाज आहे, मग तो मागास कसा असू शकतो? त्यामुळे राज्यात मोठी अस्वस्थता निर्माण होणार आहे. शैक्षणिक आरक्षण ठीक आहे. मराठा समाजासाठी जारी करण्यात आलेल्या सग्या सोयरे अधिसूचनेविरोधात आतापर्यंत लाखो हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण असेल, तर त्यांना ओबीसीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी खोटी कागदपत्रे देण्याचे कारण काय?” असा प्रश्न भुजबळ यांनी केला. तसेच जरांगे पाटील यांना या प्रकरणातील कायदेशीर बाबी समजल्या का? असा प्रश्न उपस्थित करत आयोगाने मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण १५ दिवसांत पूर्ण केल्याने भुजबळ यांनी आश्चर्य व्यक्त केले.







