
याचिकाकर्त्यानं सीबीएसई बोर्डाकडं आपली तक्रार मांडून हस्तक्षेपाची मागणी केली होती. मात्र, शाळेनं निर्धारित वेळेत ऑनलाइन पोर्टलवर सुधारित गुण सादर केले नाहीत, असंही न्यायालयात समोर आलं. त्यामुळं संतापलेल्या न्यायालयानं सुनावणी दरम्यान शाळेची खरडपट्टी काढली.







