
सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.
दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर केला. 2024-25 सालाचा अंतरिम बजेट सादर करताना रेल्वे विभागासाठी (Railway Division) मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सुखसोय अधिक चांगली होण्यास मदत होणार आहे. सरकार सामान्य गाड्यांच्या बोगी बदलून वंदे भारत (Vande Bharat Railway) सारख्या बोगी तयार करणार आहेत. याशिवाय मेट्रो आणि नमो रेलचा (Namo Rail) विस्तार इतर शहरांमध्येही करण्यात येणार आहे.
बजेटची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, सुमारे 40 हजार रेल्वे बोगींचे वंदे भारत बोगीत रूपांतर केले जाणार आहे. याबरोबरच सरकारने 3 नवीन रेल्वे कॉरिडॉर बांधण्याची घोषणा केली असून, फ्रेट कॉरिडॉरचे कामही सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत देशातील विमानतळांची संख्याही वाढल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. सध्या देशात 149 विमानतळे कार्यरत आहेत. अशी माहिती देखील सीतारमण यांनी दिली आहे.









