
Mr India Movie Kissa : बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट आले आहेत, जे कितीही जुने झाले तरी प्रेक्षक तितक्याच आवडीने ते चित्रपट बघतात. अशाच चित्रपटांपैकी एक आहे ‘मिस्टर इंडिया’. १९८७मध्ये आलेला ‘मिस्टर इंडिया’ हा हिंदी चित्रपट आजही भारतीय चित्रपटसृष्टीत आपलं स्थान कायम राखून आहे. अनिल कपूर, श्रीदेवी, सतीश कौशिक, अमरीश पुरी आणि अन्नू कपूर यांची जबरदस्त अभिनयाची जादू, चित्रपटाचे शानदार दिग्दर्शन आणि काळाच्या पुढे असलेली कथा यामुळे हा चित्रपट आजही चर्चेत आहे. विशेषतः श्रीदेवीच्या अभिनयाने या चित्रपटाला खास ठरवले होते. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक किस्से शेखर कपूर यांनी एका मुलाखतीत शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी एक खास आणि भन्नाट किस्सा सांगितला.







