
मनीषा कायंदे यांचे मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन
मनीषा कायंदे यांनी आपल्या निवेदनात लिहिले आहे की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’च्या निर्माते, प्रेक्षक व सहभागी कलाकारांवर तातडीने योग्य ती कारवाई करत प्रक्षेपण बंद करण्यात यावे.’ त्यांनी पुढे लिहिले की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’ या रियॅलिटी शोचे प्रक्षेपण २१ जून पासून सुरू झाले आहे. दररोज रात्री नऊ वाजता ओटीटीवर त्याचे प्रसारण होत आहे. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज लाखो कुटुंब हा शो बघत असतात. मात्र, १८ जुलै रोजी प्रसारित करण्यात आलेल्या या शोच्या भागामध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभित्स आणि किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते. सदर शोच्या दरम्यान अरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व सामाजिक मूल्यांची वाट लावत, शरमेने मान खाली जाईल, असे कृत्य केले आहे.