
कारवाईची मागणी!
‘बिग बॉस ओटीटी’वर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना सचिव आणि प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याकडे केली होती. मनीषा कायंदे यांनी आपल्या निवेदनात लिहिले होते की, ‘बिग बॉस ओटीटी सीझन ३’च्या निर्माते, प्रेक्षक व सहभागी कलाकारांवर तातडीने योग्य ती कारवाई करत प्रक्षेपण बंद करण्यात यावे. या शोच्या भागामध्ये कलाकार कॅमेरासमोर अतिशय बिभित्स आणि किळसवाणे कृत्य करताना दाखवण्यात येत होते. सदर शोच्या दरम्यान अरमान मलिक व कृतिका मलिक या कलाकारांनी कौटुंबिक नात्यांच्या सर्व सीमा पार करत व सामाजिक मूल्यांची वाट लावत, शरमेने मान खाली जाईल, असे कृत्य केले आहे.’