
‘बिग बॉस ओटीटी २’ च्या फिनालेमध्ये सलमान खान यानेही म्हटले होते की, जर एल्विश जिंकला तर इतिहास बनेल. व्होट व फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अभिषेक आणि एल्विश या दोघांमध्ये काट्याची टक्कर होती. फिनाले दरम्यान १५ मिनिटांसाठी लाइव वोटिंग लाइन सुरू करण्यात आली. त्यामध्ये टॉप-२ फायनलिस्ट म्हणजे अभिषेक मल्हन आणि एल्विश यादव यांच्यासाठी वोटिंग झाली. सलमान खानने सांगितले की, एल्विश आणि अभिषेकमध्ये मतांसाठी अटीतटीचा सामना झाला मात्र यातमध्ये एल्विशने बाजी मारली.








