
निक्की तांबोळीला राग अनावर
वर्षा उसगांवकर या ‘बिग बॉस’ची माफी मागतात. “चुकून झाले” असे त्या बोलल्या. त्यावर पारा चढलेली निक्की म्हणते,”आम्हाला भोगावे लागत आहे.. तुमच्यामुळे आता आम्हाला जमिनीवर झोपावे लागणार आहे.” यावर वर्षा म्हणतात,”माझ्या एकटीमुळे झालेले नाही.” त्यावर निक्की म्हणते,”तुम्ही झोपला होतात तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती.” निक्कीला शांत करत वर्षा ताई म्हणतात, “आरडाओरडा करू नको.” तरीही निक्की शांत बसत नाही उलट त्यांना प्रतिउत्तर देत त्यांनाच शांत बसण्यास सांगते.
वाचा: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरातील अंकिता वालावलकरचा बॉयफ्रेंडने केला होता छळ, वाचा खासगी आयुष्याविषयी