
निक्की आणि अभिजीतमध्ये वाद
यावर अभिजीत म्हणाला की, ‘मी कुणाशीही काहीही बोललेलो नाही.’ यानंतर दोघांची बाचाबाची सुरू असताना निक्की तांबोळीने मध्ये पडून, ‘अभिजीत तू मला बोलला होतास की, वैभववर विश्वास ठेवला होता. मात्र त्याने पुन्हा एकदा विश्वासघात केला. तू मला हे बोलला होतास की, नाही हे कबूल कर.’ निक्कीने असं बोलताच अभिजीतला त्याने बोललेली गोष्ट कबूल करावी लागली. मात्र, यावेळी अभिजीत निक्की तांबोळीवर चांगलाच वैतागलेला दिसला. ‘तुझ्यासारखे मित्र असण्यापेक्षा नसलेले बरे, तुझ्यासारख्या लोकांशी मैत्रीच नको. तुझ्यावर विश्वासही ठेवू शकत नाही’, असं म्हणत अभिजीतने निक्कीशी असलेली मैत्री तोडली आहे.