
‘बिग बॉस’ने आपला निर्णय जाहीर केल्यानंतर अंकिता आणि विकीने त्यांच्या बिग बॉसच्या प्रवासाविषयीच्या आठवणी शेअर केल्या. अंकिताने म्हटले की, तिच्यासाठी हा खूप कठीण प्रवास होता. कारण या प्रवासात तिने इतरांसोबत खूप संघर्ष केला. पण, जेव्हा ही गोष्ट विकी जैनची आली, तेव्हा तिने माघार घेतली. विकीने यावेळी म्हटले की, त्याला आता त्यांचे नाते अधिक चांगल्या प्रकारे समजू लागले आहे आणि बिग बॉसमुळे त्याला त्याच्या चुका कळल्या, याचा आनंद आहे.








