
त्यावेळी रेल्वे वॉटर फॉलवर भिजत असताना पाण्याच्या प्रवाह वाढल्याने पाच जण वाहून जाऊ लागले. एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या प्रवाहापुढं त्यांचा निभाव लागला नाही. एकाच कुटुंबातील ५ जण वाहून गेले. दरम्यान या दुर्घटनेनंतर ३६ वर्षीय महिला, एक १३ वर्षीय आणि एका ८ वर्षीय मुलीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. याशिवाय ९ वर्षांचा आणि एका चार वर्षाच्या मुलाचा शोध सुरू आहे.





