
जालना : भोकरदनमध्ये नगरपरिषद निवडणुकीची धामधूम वाढत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांमध्ये एक मोठी चर्चा सुरू झाली आहे.
ती म्हणजे —
“राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते चंद्रकांत दानवे यांनी स्वतंत्र पॅनल उभं केल्याने भाजपला मदत होणार का?”
सुरुवातीपासून मुख्य लढत ही काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच दिसत होती.
काँग्रेसकडून राजाभाऊ देशमुख, तर भाजपकडून रावसाहेब दानवे हे केंद्रस्थानी होते.
पण अचानक चंद्रकांत दानवे यांनी महाविकास आघाडीपासून वेगळं होत स्वतंत्र पॅनल उभं केलं.
यामुळे काँग्रेसची मते विभागली जाऊन त्याचा फायदा भाजपला होईल अशी शंका लोकांमध्ये निर्माण झाली.
सध्या शहरात, चौकात, टपरीवर एकच चर्चा ऐकू येते —
“दानवे यांनी स्वतंत्र पॅनल का काढलं?
यामागे भाजपला मदत करण्याचा इशारा आहे का?”
ही चर्चा आता केवळ राजकीय नेत्यांपुरती मर्यादित नसून सामान्य नागरिकांतही वाढताना दिसतेय.
निवडणुकीचे वातावरण तापत असून
आता पुढील काही दिवसात या त्रिकोणी लढतीचे परिणाम कुठे झुकतात हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.



