
विक्रांत जाधव म्हणाले, ‘मी प्रसार माध्यमांना विनंती करतो की, कुठल्यातरी पत्राचा आधार घेऊन निराधार बातम्या देऊ नका. चुकीच्या बातम्या येतात तेव्हा आम्हालाही त्रास होतो, कुटुंबाला त्रास होतो. आम्ही कुठेही जाणार नाहीत. भास्कर जाधव यांच्याबद्दल माध्यमात ज्या बातम्या सुरू आहेत, त्या सर्व निराधार आहेत. केवळ पत्राचा आधार घेऊ चुकीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. भास्कर जाधव उध्दव साहेबांची साथ सोडणार नाहीत.






