
“माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती देताना आनंद होत आहे. एक प्रतिष्ठित विद्वान आणि राजकारणी म्हणून नरसिंह राव यांनी देशाची मोठ्या प्रमाणावर सेवा केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक वर्षे संसद आणि विधानसभा सदस्य असताना त्यांनी केलेल्या कामामुळे ते आजही स्मरणात आहेत. भारताला आर्थिकदृष्ट्या प्रगत बनवण्यात आणि देशाच्या समृद्धी आणि विकासाचा भक्कम पाया रचण्यात त्यांचे दूरदर्शी नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरले. नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान असताना भारताला जागतिक बाजारपेठेत मोठे यश मिळाले. त्यांच्या कार्यकाळात देशातील आर्थिक विकासाचे नवीन पर्व सुरू झाले. भारताच्या परराष्ट्र धोरण, भाषा आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानाव्यतिरिक्त, त्यांना एक नेता म्हणून त्यांना ओळखले जाते.नरसिंह राव यांनी महत्त्वपूर्ण बदलांद्वारे भारताचे नेतृत्व केले”, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.







