
उद्धव ठाकरे म्हणाले की, “भाजपला लोकसभा निवडणुकीत बिहारमधून मते हवी आहेत, म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर करण्यात आला. मात्र, कर्पूरी ठाकूर यांच्या कार्याची इतक्या वर्षांनंतर दखल घेतली याचा आनंद आहे. भाजपने डॉ. एस. स्वामीनाथन यांचीही भारतरत्नसाठी निवड केली. मात्र, १० वर्षांनंतरही शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात सरकार अपयशी ठरले. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात सरकार अपयशी ठरले. हा पोकळपणा जनतेला दिसत आहे.”







