
त्याचबरोबर जर बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या जागी अकबर शेख, खान असता, तर नितेश राणेने थयथयाट केला असता. हलकटपणा आहे, तुम्ही जात, धर्म पक्ष बघून व्यक्त होता, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. बदलापूरच्या घटनेत न्याय मिळाला असता, तर लोक रस्त्यावर का आली असती? पोलीस आयुक्तांना प्रकरण नीट हाताळता आलं नाही. लोक का संतप्त झाले? पोलीस आयुक्त आशुतोष डुमरेंचं काय करणार? असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत.