
‘शाबास सुनबाई’,‘वजीर’, ‘अशीही बनवाबनवी’ अशा चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या. ‘अशीही बनवा बनवी’ या चित्रपटाने त्यांच्या करिअरला कलाटणी दिली. या चित्रपटानंतर त्यांच्याकडे बॉलिवूड चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या होत्या. अखेर त्यांनी‘हिना’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरपूर कमाई केली.‘हिना’ हा चित्रपट त्याकाळी सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटातील‘देर ना हो जाए कही देर ना हो जाए’ हे गाणे अश्विनी भावे यांच्यावर चित्रित केले गेले होते, जे आजही अनेकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. कारकीर्द यशाच्या शिखरावर असतानाच त्यांनी लग्न करून परदेशी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आजही त्या अनेक कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावतात.