
दिल्लीतील कथित दारू घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर मुख्यमंत्री केजरीवाल १५६ दिवसानंतर तिहार जेलबाहेर आले असून तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या दोन दिवसांनंतर आपण मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केजरीवाल यांनीकेली आहे.त्यांच्या या घोषणेनंतर, त्यांनी आताच राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने उपस्थित केला आहे. केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी ४८ तासांचा अवधी का हवा आहे, त्यांनी जेलमधूनच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा का दिला नाही, असा सवाल भाजपने केला आहे.