
या दरम्यानच आता बॉलिवूड किंवा कोणत्याही चित्रपटासाठी गाणी गायची नाहीत, असा मोठा निर्णय अनुराधा पौडवाल याणी घेतला. यामुळे त्यांची गायन कारकीर्द आणखीनच डबघाईला आली. चित्रपटांमध्ये गाणे बंद करून, त्यांनी केवळ भक्तिगीते, भजन आणि आरत्या गायला सुरुवात केली. हळूहळू त्या बॉलिवूडपासून दुरावल्या आणि नंतर त्यांनी काम करणे पूर्ण बंद केले. तर, गुलशन कुमार यांच्या निधनानंतर त्यांना पूर्वीसारखे काम मिळणे देखील कठीण झाले.








