
जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा एक फोटो ट्विट करून त्यांच्यावर अवघ्या देशाचे वाटोळे केल्याचा आरोप केला. तसेच टोपी घातली म्हणून कुणी गांधी होत नाही, असा टोलाही त्यांनी हजारेंना लगावला. यावर अण्णा हजार म्हणाले की, “माझ्यामुळे देशातील नागरिकांचा भले झाले. मात्र, त्यांच्या काही कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले, याची खंत त्यांच्या मनामध्ये असावी म्हणून त्यांनी असे ट्विट केले. याबाबत वकीलांशी चर्चा करून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा करणार आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.



