
Anandacha Shidha : दिवाळी, दसरा, गुढीपाडव्या सारख्या सणासुदीला राज्यातील गरीब व गरजू शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ ही योजना राज्य सरकारतर्फे सुरू करण्यात आली आहे. या योजनेला राज्यात चांगला प्रतिसाद लाभत असल्याने ही योजना वर्षभर राबविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे व गौरींचे आगमन दोन दिवसांवर आले असले तरी गरजू नागरिकांना या शिधाचे वाटप झालेले नाही, त्यामुळे आनंदाचा शिधा मिळाला का गं बाई ? असा प्रश्न महिला एकमेकीना करू लागल्या आहेत.