
जेव्हा अमरीश पुरी खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर यायचे, तेव्हा लोक अक्षरशः घाबरायचे. दमदार अभिनयासोबतच त्यांची संवादफेक शैलीही चाहत्यांना खूप आवडली होती. अमरीश पुरी हे आजही बॉलिवूडमधील सर्वोत्तम खलनायक मानले जातात. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘करण-अर्जुन’ या सर्व चित्रपटांमध्ये सुपरस्टार कलाकार मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होते. पण, या चित्रपटांना सुपरहिट करण्यात चित्रपटाचे खलनायक अमरीश पुरी यांचा मोठा वाटा होता.







