
आमदार यशोमती ठाकूर म्हणाल्या की, आम्ही संयम पाळणारे लोक आहोत. मात्र इथले पालकमंत्री, जिल्हाधिकारी प्रशासन काहीच ऐकायला तयार नाही. जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आहे. आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे, मी आणि असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन व कार्यालयाचे कुलूप तोडूनआत प्रवेश केला. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले.





