
पुढे कौन बनेगा करोडपती या शोनंतर अमिताभ यांचे पूर्ण दिवस बदलले. याविषयी सांगताना ते म्हणाले, ‘अमिताभ बच्चन दिवाळखोर झाले होते, त्यांच्या कंपनी एबीसीएलचे मोठे नुकसान झाले होते जे ते भरू शकत नव्हते. मात्र, त्याने कौन बनेगा करोडपतीसह बाउन्स बॅक केले. सर्वात धक्कादायक म्हणजे त्याने त्याच्या सर्व जुन्या मित्रांना लांब केले होते.केबीसीमध्ये रुजू झाल्यानंतर तो बदललेला माणूस होता. केबीसीनंतर अमित जी आणि माझे नाते बदलले. आधी जयाजी मला फोन करून माझ्या कुटुंबासमवेत होळी साजरी करण्यासाठी आमंत्रण द्यायच्या. पण हळूहळू आमंत्रणे येणे बंद झाले आणि संपर्क पूर्णपणे तुटला. त्याचा माझ्या करिअरवर परिणाम झाला नाही पण वाईट वाटले.’






