
पोषण आहारावर प्रश्नचिन्ह
राज्यातील सर्व शाळांमध्ये दुपारच्या वेळेला पोषण आहार दिला जातो. हा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरम्यान, अकोला शहरातिल महानगर पालिकेच्या शाळेतील हा प्रकार गंभीर आहे. खिचडीमध्ये मेलेल्या उंदराचे अवशेष सापडल्याने आहाराच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकारामुळे पालक संतप्त झाले आहे. विद्यार्थ्यांची जीवाशी खेळ केल्याचा हा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पालिका विभाग आणि शालेय शिक्षण विभागावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.






