
नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील विविध विभागांमध्ये सुमारे दीड लाख पदे भरणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. तलाठी, पोलीस, शिक्षक, आरोग्य, कृषी, जलसंपदा, जलसंधारण, वने अशा विविध विभागामध्ये दीड लाख नवीन पदांची भरती केली जाणार आहे.



