
या कारखान्याच्या चौकशीसाठी चौकशी पथक अजित पवारांच्या बहिणीच्या घरीही जाऊन आले आहे. त्यानंतर हे प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच आता लोकसभा निवडणुकीचा राज्यातील पाच टप्पे संपताच राज्य सरकारकडून पुन्हा चौकशीचा ससेमिरा सुरू केला आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर कारखान्यातील कथित गैरव्यावहार, कोरेगाव येथील एक भूखंड आणि डीस्टलरी प्रकल्पासंर्दभात एसीबीकडून ही चौकशी केली जात आहे.





